
नमस्कार मित्रांनो बऱ्याच लोकांना हाय बीपी म्हणजेच उच्च रक्तदाब झाल्याने अटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे. याचे मुख्य कारण हाय बीपी असते. त्याचप्रमाणे अनेक व्यक्तींना हृदयाचे ब्लॉकेजेस होतात. हे सामान्यपणे कोलेस्ट्रॉल मुळे घडून येतात. कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार असतात. एक लो डेन्सीटी आणि हाय डेन्सीटी कोलेस्ट्रॉल. लो डेन्सीटी कोलेस्ट्रॉल हे खराब स्वरूपाचे असते आणि हे खराब कोलेस्ट्रॉल जेव्हा धमणीत साचते तेव्हा धमन्या ब्लॉक होतात आणि हृदयाला जे रक्त येते ते रक्त येत नाही.
याचे प्रमाण पन्नास टक्क्याच्या खाली असेल तर आपले काम सुरळीत चालते. मात्र पन्नास टक्क्यांच्या जास्त वाढले तर ब्लॉक होतात. परिणामी हृदयाला जे रक्त येत ते थांबलं तर अटॅक येण्याची शक्यता असते आणि अटॅक आल्यावर व्यक्ती दगावण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे अनेक व्यक्तींना अपचन, पित्त, गॅसेस, असिडिटी, हातापायाला मुंग्या येणे, अशक्तपणा, थकवा, सांधेदुखी याचे जे प्रोब्लेम्स असतात हे सर्व प्रॉब्लेम दूर करणारा हा उपाय आहे. यासाठी लागणारे सर्व साहित्य आपल्या घरी उपलब्ध होते. चला तर पाहुयात उपाय..
आपल्याला पहिला घटक लागणार आहे तो म्हणजे लसूण, लसणाच्या पाकळ्या. लसूण हा प्रत्येकाच्या घरी असतो. शंभर ग्रॅम लसणामध्ये 150 कॅलरीज, सात ग्रॅम प्रोटीन, व्हिटॅमिन B1, B2, B3, B6 हे सर्व प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात. त्याचबरोबर व्हिटॅमिन C असते आणि सोडियम आणि झिंकही मोठ्या प्रमाणात असते हे पोट साफ होण्यासाठी उपयुक्त असते व ह्यूमैनिटी पॉवर वाढवते. लसनातील हे सर्व घटक रक्त गोठू देत नाहीत.
रक्तात खराब असणारे कोलेस्ट्रॉल वितळून ब्लॉकेज कमी करतात. लसणाला रक्त शुद्ध करण्याची मशीन असे म्हटले जाते. ज्या व्यक्तींना रक्त शुद्ध करण्यासाठी वापरायचं आहे त्यांनी कच्चा लसूण खाल्ला तर खूप फायदा होतो. रक्तातील शुगर कमी करण्यासाठी पोलिसिन नावाचा घटक लसणामध्ये मोठया प्रमाणात आहे.
रोज सकाळी दोन लसणाच्या पाकळ्या चावून खाल्ल्या तर खूप फायदा होतो. यामध्ये दुसरा पदार्थ लागणार आहे तिळाचे तेल. यामध्ये लिओनीक ऍसिड जे की रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते हे मोठया प्रमाणात असते. यात मॅग्नेशियम, सेलेनियम भरपूर प्रमाणात असते जे हृदयाला बळकटी देते. रक्त पातळ करण्यासाठी व बीपी कंट्रोल करण्यासाठी हे तिळाचे तेल अत्यंत उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे हाडे देखील मजबूत होतात. हे साधारणतः एक चमचा घ्यायचे आहे.
सुरुवातीला एक चमचा तिळाचे तेल घ्या. हे थोडे गरम झाले जी त्यात पाच लसणाच्या पाकळ्या टाका. तुम्ही या पाकळ्या सोलून किंवा जशाच तशा टाकल्या तरी चालतील. जर तिळाचे तेल मिळाले नाही तर त्यांनी तिळाच्या तेलाच्या ऐवजी एक कप दूध वापरावे. एक कप दुधामध्ये पाच लसूण पाकळ्या उकळाव्यात. त्यांनतर लसूण पाकळ्या आणि दूध दोन्हीही खायचे आहे. जर एखाद्या व्यक्तीस दूध जमत नसेल तर एक कप साधे पाणी घ्यावे त्यामध्ये पाच लसूण पाकळ्या टाकाव्यात पाच मिनिटे उकळावे. त्यात त्याचा गर मिक्स झाल्यावर ते पाणी व लसूण पाकळ्या दोन्ही खाऊन घ्यावे.
आपण वर लसून तीळ तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहेत. या साधारणतः लाल होईपर्यंत फ्राय करायच्या आहेत. त्यांनतर लसूण पाकळ्या फक्त बाजूला काढून त्या आपल्याला चावून चावून खायच्या आहेत. त्यावर एक ग्लास कोमट पाणी घ्यायचे आहे. हा उपाय तीन वर्षांपासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत करू शकता. हा उपाय केल्यानंतर अर्धा तास काही खायचे नाही. मात्र अर्धा तास झाल्यानंतर कोणता ना कोणता पदार्थ सेवन करायचा आहे. सलग एकवीस दिवसानंतर याचे परिणाम तुम्हाला दिसतील.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.